PostImage

Zadipatti VC News and Business

May 16, 2025   

PostImage

सरकारी शिव भोजन थाली केंद्र बनले हॉटेल



गडचिरोली:-
           जिल्ह्यामध्ये सुरू असणारे शिव भोजन थाली केंद्र हे गरजू आणि गरीब लोकांसाठी एक आशेचा किरण आहे.  जिल्ह्याच्या ठिकाणी तीन ते चार केंद्र चालू असून लाखो रुपयाची निधी येत असते परंतु याकडे कोणाचेही लक्ष नाही. त्यामुळे सरकारी शिव भोजन केंद्र हे हॉटेलचे स्वरूप घेऊन राहिले आहे.

         गडचिरोली हे जिल्ह्याचे ठिकाण असल्यामुळे बाहेर तालुक्यातील मुलं आणि मुली येथे स्पर्धा परीक्षा करिता येऊन आपले अभ्यास  करण्यात त्यांचा पूर्ण दिवस जातो तशातच त्यांना जेवणासाठी पण वेळ भेटत नाही अशा वेळी हे विद्यार्थी शिव भोजन केंद्राचा आश्रय घेतात परंतु शिव भोजन थाली केंद्र फलकावर सकाळी 11 वाजेपासून ते 4 वाजेपर्यंत असा वेळ दिला असतो वास्तविकता ते सर्व खोटे आहे जेमतेम काही लोकांचे जेवण तयार करून ते साडेबारा ते एक वाजेपर्यंत सुरू असते. त्यानंतर यांनी उभारलेले हॉटेल सुरू होतात हे वास्तविकता जाण्यासाठी कोणत्याही आमदार, खासदाराने किंवा सरकारी कर्मचाऱ्यांनी पाठपुरावा केलेला नाही त्यामध्ये विद्यार्थ्यांचे तसेच गरीब आणि गरजू लोकांना याचा फार मोठा फटका बसून राहिला आहे. 
     गडचिरोली महिला हॉस्पिटल समोर असणारे शिव भोजन थाली केंद्र सुद्धा अकरा वाजता बंद केल्या जातो आणि त्यानंतर तिथे हॉटेल व्यवस्था केली जाते परंतु महिला हॉस्पिटलमध्ये येणारे रुग्णांचे नातेवाईकांना याचा कोणताही फायदा होत नाही. हॉस्पिटलमध्ये आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकाकडे कधी कधी पुरेसे पैसे पण राहत नाही अशा वेळेस त्यांच्या जेवणाचा प्रश्न भेडसावतो अशा प्रकारे अकरा वाजता हे शिव भोजन थाली केंद्र बंद झाल्यानंतर त्यांना महाग हॉटेलमध्ये जेवण करावे लागते याकरिता गडचिरोली जिल्ह्यातील खासदार आणि आमदार तसेच जिल्हाधिकारी साहेब व सरकारी कर्मचारी यांनी त्वरित लक्ष देऊन या योजनेचा गरीब गरजू लोकांना कसा फायदा होणार याकडे लक्ष द्यावे अशी मागणी काही लोकांकडून होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2025   

PostImage

हिश्याच्या वाटणी वरुण स्वताच्या भावाला जीवानीशी केले ठार


हिश्याच्या वाटणी वरुण स्वताच्या भावाला जीवानीशी केले ठार 

 

 

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बाळद खुर्द येथे घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो या कारणावरून धक्काबुक्की करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली.  हातात लाकडी दांडके घेऊन तरुणाच्या चेहऱ्यावर व छातीवर मारहाण करून त्याच जीवे ठार मारल्याची घटना दि.८ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. घटनास्थळी भडगाव पोलिसांनी तातडीने धाव घेऊन संशयित बाप आणि मयताच्या भावाला अटक याप्रकरणी भडगाव पोलीस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी- सुनिल लोटन पाटील वय (५४) धंदा शेती व पोलीस पाटील, रा. बाळद खु. ता भडगांव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) (वय २६)रा. बाळद खु ता. भडगांव जि. जळगांव हा घराचे वाटणीत जास्त हिस्सा मागतो याकारणावरुन बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) यास धक्काबुक्की करुन लाथाबुक्कयांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच हातात लाकडी दांडके घेवून बाळु राजेंद्र शिंदे (नाईक) याच्या चेहऱ्यावर व छातीवर मारहाण करुन त्यास जीवे ठार मारले.

भडगाव पोलीस स्टेशनला बाप व भाऊ १)भारत राजेंद्र शिंदे, वय २२ वर्ष २) राजेंद्र रामचंद्र शिंदे, वय ४८ वर्ष, दोन्ही रा. बाळद खु ता. भडगांव जि.जळगांव. यांच्याविरुद्ध गु.र.न १२३/२०२५ बी.एन.एस.१०३(१), ११५ (२), ३५२,३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गणेश म्हस्के व पोलीस कॉन्स्टेबल महेंद्र चव्हाण हे करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2025   

PostImage

डीपी खाली कचरा कुंडी खाली कचरा कुंडी असल्यागत नागरिकांनी कचरा …


डीपी खाली कचरा कुंडी खाली कचरा कुंडी असल्यागत नागरिकांनी कचरा टाकून जाळल्यामुळे इलेक्ट्रिक वायर जळाले ,  सहा तास विद्युत पुरवठा ख़डीत

 

 


आष्टी (प्रतिनिधी)## येथील वार्ड क्रं.१ मध्ये बाजारवडी जवळ असलेल्या डीपी च्या खाली नागरिकांनी कचराकुंडी असल्यासारखे  कचरा टाकून जाळला त्यामुळे इलेक्ट्रिक वायर जळाले . आणि बराच वेळ विद्युत पुरवठा खंडित झाला त्यामुळे नागरिकांना गर्मीमुळे चांगलाच त्रास सहन करावा लागला. 
येथील बाजार वाडीत असलेल्या इलेक्ट्रिक डिपी मधून या वॉर्डातील नागरिकांना विद्युत पुरवठा केला जातो. या डीपी च्या खाली नागरीक घरातील केरकचरा आणून टाकतात . बराच कचऱ्याचा ढीग जमा झाल्याने तो जाळण्यात आला त्यामुळे डीपी मधून आलेले वायर जळुन खाक झाले. आणि विद्युत पुरवठा खंडित झाला. नागरिकांना बराच काळ गर्मी मध्ये बसून उष्णतेचा त्रास सहन करावा लागला. 
येथील वॉर्डातील काही नागरीक डीपी च्या खाली कचरा जमा करीत आहे. ग्राम पंचायती मार्फत  त्या ठिकाणी कचरा कुंडी ठेवण्याची व्यवस्था करावी . याबाबत ग्राम पंचायत चे सरपंच यांना विचारणा केली असता येथील नागरिकांना वारंवार डीपी च्या खाली कचरा न टाकण्याच्या सूचना दिल्या होत्या.तरी पण नागरीक त्याच ठिकाणी कचरा टाकत आहे. याबाबत पोलिसांना सूचना देऊन कचरा टाकण्याऱ्यावर कारवाही करण्याची मागणी केली आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2025   

PostImage

आष्टी चामोर्शी मार्गावरील अनखोडा सोसायटी जवळ बाईक व ट्रकचा अपघात …


आष्टी चामोर्शी मार्गावरील अनखोडा सोसायटी जवळ बाईक व ट्रकचा अपघात , अपघातात दुचाकीस्वार ठार

 

 

आष्टी प्रतिनिधी 

 आष्टी चामोर्शी महामार्गावरील 353 नॅशनल हायवे आष्टी पासून जवळच असलेल्या अनखोडा बस स्टॉप जवळ सुमारे आठ वाजून पंधरा मिनिटांनी आष्टी वरून उमरी गावला जात असताना आणि ट्रक हा गडचिरोली वरून आष्टी कडे येत असताना अनखोडा येथील सोसायटीच्या जवळ भीषण अपघात झाला त्या अपघातामध्ये दुचाकी चालक होमेश विकास अलगमकार वय २१ राहणार उमरी तालुका चामोर्शी जिल्हा गडचिरोली याला ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे नेण्यात आले व त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले व ट्रक चालक 
रामहीत शिंग यादव वय ५५  राहणार डोखटनिया जिल्हा गाजीपूर  उत्तरप्रदेश असे ट्रक चालकाचे नाव आहें ट्रक क्रमांक MH 34 B ग 7905 असून सदर घटनेची माहिती मिडताच पोलीस निरीक्षक विशाल काळे स्वतः आपल्या कर्मचाऱ्यांसोबत दाखल होऊन स्वतःच्या गाडीमध्ये सदर व्यक्तीला ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे पोहोचवण्यासाठी मदत केली व सदर घटनेची तपास पोलीस निरीक्षक विशाल काळे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2025   

PostImage

विहिरीचे खोदकाम करणाऱ्या मजुरांवर कोसळला मातीचा ढिगारा- दोन मजुरांचा मृत्यू …


विहिरीचे खोदकाम करणाऱ्या मजुरांवर कोसळला मातीचा ढिगारा- दोन मजुरांचा मृत्यू तर एका मजुराचे वाचले प्राण

 

सिरोंचा :- जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यातील जानमपल्ली येथे शेतातील विहिरीचे खोदकाम करतांना अचानकपणे तीन मजुरांच्या अंगावर मातीचा ढिगारा कोसळल्याने दोन मजुरांचा मृत्यू झाला तर एक मजूर थोडक्यात बचावला असल्याची घटना आज, मंगळवार ८ एप्रिल रोजी सकाळी पावणे दहाच्या सुमारास घडली. कोंडा समय्या वय ३६ वर्षे रा.

जानमपल्ली, ता. सिरोंचा व उप्पूला रवी वय ३१ वर्षे रा. जानमपल्ली, ता. सिरोंचा अशी मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यु झालेल्या मजुरांची नावे आहेत. तर संतोष कोनम वय ३२ वर्षे रा. जानमपल्ली हा थोडक्यात बचावला आहे.

माहितीनुसार, सिरोंचा तालुक्याच्या जानमपल्ली येथील शेतकरी धन्नाडा समक्का या शेतकऱ्याच्या शेतात विहीर बांधकामाचे काम सुरू असून आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास विहिरीच्या आतमध्ये तीन मजुरांद्वारे खोदकाम सुरू होते. सदर विहिरीचे खोदकाम हे जवळपास ५० फूट खोलपर्यंत जाऊन पाण्यासाठी आणखी खोदकाम करीत असतांना अचानकपणे खालच्या स्तरातील माती व वरच्या स्तरावरील माती
तिन्ही मजुरांवर कोसळली. त्यामुळे कोंडा समय्या व उप्पूला रवी मातीच्या ढिगाऱ्याखाली बराच काळ दबल्या गेले. अशातच तिसरा मजूर संतोष कोनम हा अर्धवट दबल्या गेल्याने माती ओढण्यासाठी विहिरीच्या नजीक असलेल्या मजुरांनी त्याला दोरखंडाणे ओढून बाहेर काढले. लागलीच सदरची घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच पोलीस प्रशासन, स्थानिक पदाधिकारी यांनी बचाव कार्य सुरू केले. मात्र, बराच वेळ मातीच्या ढिगाऱ्याखाली राहिल्याने दोन्ही मजुरांचा मृत्यू झाला. सदर घटनेचा पुढील तपास सिरोंचा पोलीस प्रशासन करीत आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2025   

PostImage

कोनतेही वाहण नसतांना ड्रंक अँड ड्राईव्ह'च्या नावाखाली दुर्गापूर पोलिसांनी पायदळ …


कोनतेही वाहण नसतांना ड्रंक अँड ड्राईव्ह'च्या नावाखाली दुर्गापूर पोलिसांनी पायदळ तळीरामाला कोंबले वाहणात

 

 


चंद्रपूर (दुर्गापूर) – दुर्गापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत मंगळवारी रात्री एक विचित्र प्रकार घडला. मेजर गेटजवळील एका बिअर बारसमोर दोन पोलिसांनी थेट बारसमोर आपले वाहन लावून, बिअर बारमधून बाहेर पडणाऱ्या एका पायदळ तळीरामाला 'दारू पिऊन आहेस, गाडीत बस' म्हणत पोलिस वाहनात कोंबले. ही संपूर्ण घटना समोर असलेल्या नागरिकांच्या उपस्थितीत घडली.

दारू पिऊन गाडी चालवणे हा दंडनीय अपराध आहे. मोटार वाहन कायद्याचे कलम १८५ मद्यपान करून वाहन चालविण्यास प्रतिबंधित करते आणि हे कृत्य दंडनीय गुन्हा आहे. मात्र, संबंधित व्यक्ती कोणतेही वाहन चालवत नव्हती. तो फक्त रस्त्याने पायदळ घरी जात होता. अशा अवस्थेत त्याला 'ड्रंक अँड ड्राईव्ह'च्या कारणाखाली पोलीस स्टेशनकडे घेऊन जाण्यात आले. यामुळे उपस्थित लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्या व्यक्तीला पाहून इतर तळीरामही घाबरून गेले.

मेजर गेट परिसरात केवळ ५०० मीटर अंतरातच सुमारे १० पेक्षा अधिक बिअर बार, वाईन शॉप्स आणि देशी दारूचे ठिकाणे आहेत. या ठिकाणी पोलीस वाहनं नेहमी उभी दिसतात. मात्र तपासणी न करता आणि कुठल्याही कायदेशीर कारणाशिवाय, अशाप्रकारे पायदळ चालणाऱ्या तळीरामाला थेट वाहनात कोंबण्याची ही कृती गंभीर मानली जात आहे.

यावेळी संबंधित व्यक्तीने "दारू पिऊन घरी जात होतो, गाडी नव्हती, तरीही उचलून नेत आहेत, मग दारू प्यायचंच नाही का?" असा सवाल करत आपली नाराजी व्यक्त केली.या घटनेवरून अनेक तर्क-वितर्क उपस्थित झाले आहेत. संबंधित व्यक्तीला पोलीस स्टेशनपर्यंत नेले की वाटेतच काही 'व्यवहार' होऊन सोडून दिले, याची चर्चा परिसरातील मद्यपी करताना दिसले.

स्थानिक नागरीक आणि ग्राहकांच्या मते, पोलीस कारवाई ही कायदेशीर चौकशीच्या आधारेच व्हावी, अन्यथा ही जबरदस्ती मानली जाईल. प्रशासनाने याची दखल घ्यावी, अशी मागणी देखील यानंतर जोर धरत आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2025   

PostImage

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना रिपब्लिकन पक्षाचे वतीने अभिवादन.


बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना रिपब्लिकन पक्षाचे वतीने अभिवादन.

 

 

गडचिरोली -- रिपब्लिकन पक्षाचे सेनानी तथा राज्यसभेचे माजी उपाध्यक्ष दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृती ना निमित्त  बुधवार दिनांक ९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८ वाजता इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे वतीने अभिवादन करण्यात आले. 
   रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विलास निंबोरकर यांच्या हस्ते बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व मेणबत्ती प्रज्वलित करून दिवंगत नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा विजय असो अश्या घोषणाही यावेळी देण्यात आल्या.
    याप्रसंगी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष हंसराज उंदीरवाडे, ज्येष्ठ आदिवासी कार्यकर्ते वसंत कुलसंगे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा सरचिटणीस प्रा. गौतम डांगे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्राचार्य प्रकाश दुधे, सचिव प्रा. राजन बोरकर, मराठा सेवा संघाचे डॉ. सुरेश लडके,  महिला आघाडीच्या ज्येष्ठ नेत्या सुरेखाताई बारसागडे, जिल्हाध्यक्ष नीता सहारे, शहर अध्यक्ष वनमाला झाडे, युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र रायपुरे, ज्येष्ठ कार्यकर्ते सुखदेव वासनिक, प्रेमेंद्र सहारे, सिद्धार्थ रामटेके, लहूजी रामटेके यांचेसह बरेच मान्यवर उपस्थित होते.
     उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.


PostImage

Vaingangavarta19

April 9, 2025   

PostImage

मार्कंडा देवस्थान येथील मार्कंडेश्वराचे जिर्णोद्धाराचे काम पुर्णत्वास का होईना ? …


मार्कंडा देवस्थान येथील मार्कंडेश्वराचे जिर्णोद्धाराचे काम पुर्णत्वास का होईना ? मनोज हेजीप यांची जिल्हाधिकारी यांचे कडे केली मागणी 

 

चामोर्शी:-


गेल्या अनेक वर्षापासून मार्कंडेश्वर मंदिर पुरातत्व विभागाकडून अपूर्ण बांधकाम यावर स्थानिक क्षेत्रातील भाविकांच्या  प्रतिक्रिया  घेतल्या असता अयोध्या मंदिर दोन वर्षात पूर्ण होते मग विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराचं जिर्णोद्धाराचे काम का होत नाही अश्या बोचक्या प्रतिक्रिया तालुक्यातील भाविक भक्तांनी दिलेल्या आहेत गेल्या दहा वर्षापासून मार्कंडेश्वराच्या जीर्णोद्वाराच्या कामाला सुरुवात झाली मात्र आज पावतो काम अपूर्ण राहिला आहे केंद्रातील व राज्यातील शासनकर्ते यांच्या नाकर्तेपणामुळे विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडेश्वराचं मंदिर अजूनही अपूर्ण अवस्थेत असल्याने जनतेत संतापाची लाट पसरलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला बांधकाम उघड्यावर पडलेला पाहून श्री संत मुरलीधर महाराज यांनी सदर बांधकामाचा विडा उचललेला आहे आणि जोपर्यंत माझ्या मार्कंडेश्वराचा बांधकाम पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही माझं मरण आलं तरी चालेल पण तेही मार्कंडेश्वरा तच अशी संताप जनक प्रतिक्रिया श्री संत मुरलीधर महाराज यांनी दिली आहे त्यांनी पत्रकार परिषदेला आव्हान करून सांगितले की जोपर्यंत माझ्या मार्कंडेश्वराचा बांधकाम पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही तालुक्यातीलच नव्हे तर सर्व गडचिरोली जिल्ह्यातील भाविक भक्तांमध्ये जनजागृती करून मोठा जन आंदोलन उभा करणार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिलेली आहे 
मार्कंडेश्वर आजचा बांधकाम पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आला असून कुठल्याही प्रकारची निविदा काढली जात नसून त्यात प्रचंड भ्रष्टाचार होत असल्याचेही पत्रकार परिषदेत सांगितले सदर बांधकामावर कोणतेही लोकप्रतिनिधींचे लक्ष नसून  स्थानिक बांधकाम जीर्णोद्धार समितीला कोणतेही बांधकाम पाण्याचा अधिकार नाही किंवा त्यांना त्या परिसरात फिरण्यासाठी बांधकाम पाहण्यासाठी मज्जाव करण्यात येते हे स्थानिकांचे किंवा पदाधिकाऱ्यांचे दुर्भाग्यच समजावे लागते स्थानिक बांधकामांमध्ये शिल्पकलेन कोरीव असे बांधकाम केलेले पौराणिक दगड किंवा शिल्पकला असलेले जुने दगड वापरले जात नसून त्यात बाहेरून बोलाविले गेलेले दगड वापरण्यात येत असल्याने येथील बांधकाम बंद करण्यात यावे आणि शिल्प करला कोरी व कोरीव दगड वापरण्यात यावे अशी स्थानिक भाविकांची मागणी होत आहे जो जोपर्यंत बांधकामाला सुरुवात होणार नाही तोपर्यंत मार्कंडेश्वरातील स्थानिक जनता स्वस्त बसणार नाही अशी मागणी मार्कंडेश्वर देवस्थान पुजारी श्री मनोज हे जी प यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2025   

PostImage

आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजीत पवार गटाचा महिला पक्ष …


आष्टी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजीत पवार गटाचा महिला पक्ष प्रवेश व सदस्य नोंदणी मेळावा संपन्न.

डॉ.सोनल कोवे मुळे पक्षाला नवी उभारी,महिलांमध्ये उत्साहाचे वातावरण

आष्टी :-

 आष्टी येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षा सौ. रुपालीताई चाकणकर व आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या आदेशाने आणी महिला जिल्हाध्यक्ष डॉ.सोनल कोवे व सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाने आणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महिला जिल्हाउपाध्यक्ष सौ.पुष्पा बुर्ले यांच्या नेतृत्वात सदस्य नोंदणी व महिला पक्षप्रवेश मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
         या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर होते तर अध्यक्ष म्हणून महिला जिल्हाध्यक्षा डॉ.सोनल कोवे तर प्रमुख पाहुणे म्हणून सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम होत्या.
कार्यक्रमात असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते आणी मोठ्या प्रमाणात सदस्य नोंदणीला सुरुवात झाली.
    आष्टी येथिल अनेक युवक, युवती, महिला यांनी पुष्पा बुर्ले व प्रणय बुर्ले यांच्या नेतृत्वात पक्षात प्रवेश केले.
मार्गदर्शन करताना जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, डॉ.सोनल कोवे व तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी पक्षाच्या ध्येय धोरणाबाबत माहिती समजावून सांगितले व पक्षाच काम यापेक्षा अजून जोमाने वाढला पाहिजे याकरिता रीतसर मार्गदर्शन केले.
       त्यावेळी जिल्हा सरचिटणीस लौकिक भिवापुरे, जिल्हाउपाध्यक्ष डॉ.नोमेश जुवारे, जिल्हासंघटन सचिव डॉ.हेमंत भाकरे, महिला जिल्हा कार्याध्यक्ष सारिका गडपल्लीवार, गडचिरोली शहराध्यक्ष अमोल कुळमेथे, महिला चामोर्शी तालुकाध्यक्ष रुपाली दुधबावरे, जिल्हासचिव कपिल बागडे, पुरुषोत्तम खेडेकर, बंडू मेश्राम, संदीप सोयाम, अशोक बुर्ले, रमेश बुर्ले आदी कार्यकर्ते मोठया प्रमाणात उपस्थित होते.
तर सर्व मान्यवरांचे तसेच सर्व कार्यकर्त्यांचे आभार व्येंकटेश बुर्ले यांनी मानले.


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2025   

PostImage

रानडुकराने केला घात पोलीस हवालदार पती -पत्नीसह दोन्ही मुले ठार


रानडुकराने केला घात पोलीस हवालदार पती -पत्नीसह दोन्ही मुले ठार 

 

 

वर्धा:-

रानडुकराने घात केल्यामुळे. एक हसरं चौकोनी कुटुंब संपले. वर्धा तालुक्यातील तरोडा येथे हा अपघात सोमवारी रात्री घडला. त्यात वडनेर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार प्रशांत वैद्य, त्यांची पत्नी व दोन मुलं ठार झाले आहेत. प्रशांत वैद्य यांना सेवाग्राम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

पण आज सकाळी सात वाजता त्यांचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याचे वडनेर ठाणेदार लोकरे यांनी सांगितले. प्राप्त माहितीनुसार वैद्य हे कुटुंबासह मांडगाव येथील श्रीराम मंदिरात उत्सव व महाप्रसाद कार्यक्रमासाठी आले होते. सोबत पत्नी प्रियंका वैद्य तसेच मुलगा प्रियांश ६ व मुलगी माही वर्ष ३ हे पण होते.

महाप्रसाद कार्यक्रम आटोपून ते आपल्या एम एच ४० ३६०३ या क्रमांकाच्या स्विफ्ट गाडीने परत निघाले होते. वर्ध्याकडे येत असतांना मांडगावजवळ रस्त्याच्या मधोमध रानडुक्कर गाडीपुढे आले. त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा गाडी समोरून येणाऱ्या टँकरला धडकली. मोठा अपघात घडला.

घटनास्थळीच पत्नी व मुलाचा मृत्यू झाला. तर प्रशांत मधुकर वैद्य व त्यांची मुलगी रुग्णालयात मरण पावले. रात्री ११ वाजता ही घटना घडल्याचे समजते. तरोडा हायवे वर हा अपघात घडला. टँकर एम एच ०९ सी व्ही २१८५ या गाडीस अपघातग्रस्त स्विफ्ट डिझायर ही गाडी वेगात धडकल्याने हा अपघात घडल्याचे सांगितल्या जाते.

अपघातस्थळी पोलीस उपनिरीक्षक सपाटे, भोगे व काकडे हे पोहचले होते. जखमी झालेल्यांना प्रथम सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात दाखल केल्या गेले होते.

अपघात घडल्याचे माहित होताच लगतचे गावकरी धावून आले. त्यांनी पोलीस विभागास माहिती देत रुग्णवाहीका बोलावून घेतली. त्वरित रुग्णालयात पाठविण्यात आले. वैद्य हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना नागपूरच्या रुग्णालयात पाठविण्यात आले होते.

पण त्यांचा जीव वाचविण्यात अपयश आले. प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबासोबत वर्धेतील प्रताप नगर भागात निवापण त्यांचा जीव वाचविण्यात अपयश आले. प्रशांत वैद्य हे आपल्या कुटुंबासोबत वर्धेतील प्रताप नगर भागात निवासी होते. एकाच अपघातात सर्व कुटुंब उध्वस्त झाल्याने सर्वत्र शोक व हळहळ व्यक्त केल्या जात आहे.

अपघातग्रस्त कारची स्थिती समोरून चेंदामेंदा झाल्यागत आहे. सोमवारी रात्री झालेला हा अपघात भयावह असल्याचे घटनास्थळीचे चित्र आहे. या अपघातास कारण ठरलेला रानडुक्कर पण तिथेच ठोस बसल्याने मृत झाला.


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2025   

PostImage

रूंजीने घेतले पैकीच्या पैकी गुण व राज्यात आली प्रथम त्या …


 रूंजीने घेतले पैकीच्या पैकी गुण व राज्यात आली प्रथम त्या गावासाठी ठरली गौरवाची  बाब 


साकोली : शहरातील जिल्हा परिषद इंग्रजी प्राथमिक शाळा क्र. २ येथील इयत्ता दूसरीची विद्यार्थीनी रूंजी संग्रामे ही भारतीय प्रज्ञाशोध परीक्षेत २०० पैकी २०० गुण घेत महाराष्ट्र राज्यात प्रथम आली आहे. ही साकोलीसाठी अत्यंत गौरवाची बाब असून सर्वप्रथम साकोली गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांनी त्या मुलीचे विभागातर्फे कौतुकास्पद अभिनंदन केले आहे.

जानेवारी २०२५ ला भारतीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात आली. यामध्ये इयत्ता २ रीची रूंजी सुधाकर संग्रामे हिने अक्षरशः २०० पैकी २०० गुण प्राप्त करून महाराष्ट्रात प्रथम येण्याचा मान राखला. ही साकोली शहरासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. रूंजी संग्रामे ही शासकीय शाळेतील विद्यार्थीनीने महाराष्ट्रात साकोलीचे नाव चमकविले त्याबद्दल पंचायत समिती, जि. प. शाळा साकोली केंद्र प्रमुख डि. ए. थाटे, सहा. शिक्षक पल्लवी लुथडे, पी. एस. देशपांडे, उमेश भस्मे, आशा वलथरे, लता इळपाते, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष योगराज मुंगमोडे, उपाध्यक्ष सौ. बावणे, जि. प. केंद्रीय शाळा मुख्याध्यापक डी. डी. वलथरे, शिक्षक एम. व्ही. बोकडे, चेतन बोरकर, टी. आय. पटले, चित्ररेखा इंगळे, शालिनी राऊत, श्रद्धा औटी आणि साकोली मिडीया नेटवर्क व समस्त पंचायत समिती शिक्षकवृंद यांकडून रूंजी संग्रामे हिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2025   

PostImage

नोंदीमध्ये 19000 क्विंटल धान्य, आणि प्रत्यक्ष गोदामात केवळ 3000 क्विंटल …


नोंदीमध्ये 19000 क्विंटल धान्य, आणि प्रत्यक्ष गोदामात केवळ 3000 क्विंटल धान्य, उर्वरित धान्य कोणाच्या घशात

 

 

गडचिरोली:-
महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळ अंतर्गत कुरखेडा तालुक्यातील देऊळगाव येथील आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्था केंद्राच्या नोंदीमध्ये 19000 धान्य क्विंटल खरेदी दाखवलेली आहे. मात्र त्या ठिकाणी 3000 क्विंटल धान्य शिल्लक आहे. बाकी धान्य गेले कुठे? असा प्रश्न सामान्य जनतेतून उपस्थित होत आहे. खरेदी केंद्रावरील बारदान्यामध्ये सुद्धा तफावत आढळून आलेली आहे. दीड कोटी रुपयाचा धान्य घोटाळा झाल्याचे संशय आहे. प्रादेशिक व्यवस्थापक सोपान सांबरे यांनी केंद्राचे अध्यक्ष आणि अधिकाऱ्यांना नोटीस बजावून केंद्राला शील ठोकले आहे. या घटनेमुळे धान्य घोटाळा करणाऱ्या माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. चालू वर्षाची खरेदी सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आली आहे. देऊळगाव येथील खरेदी केंद्रावर 2023 24 वर्षांमध्ये खरीप हंगामा बऱ्याच प्रमाणात अनियमितताआढळल्याचे माहिती आहे. खरेदी केंद्रावर 2024-25 या चालू हंगाम वर्षामध्ये याची सुद्धा चौकशी होणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र या घोटाळ्याची व्याप्ती वाढणार आहे. जिल्ह्यातील संपूर्ण आदिवासी विविध कार्यकारी संस्था फेडरेशन खरेदी केंद्रावर चालू वर्षांमध्ये एकूण झालेली धान्याची खरेदी आणि शिल्लक धान्यसाठा याची चौकशी करावी यामुळे खरेदी केंद्रावरील प्रत्यक्ष वस्तुस्थिती ही दिसून येईल असे सुद्धा सामान्य जनतेतून बोलले जात आहे.


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2025   

PostImage

९ एप्रील रोजी बुद्धगया मुक्तीसाठी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन


९ एप्रील रोजी बुद्धगया मुक्तीसाठी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन

 

 

गडचिरोली - बुद्धिष्ट इंटरनेशनल नेटवर्क आरपीआय, भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय बेरोजगार मोर्चा व विविध संघटनाच्या वतीने ९ एप्रील २०२५ बुधवारला दुपारी १२ वाजता बुद्धगया मुक्तीसाठी राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येणार आहे.

इंदिरा गांधी चौक गडचिरोली येथून रॅली काढून राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे. ईव्हीएम हटाओ ओबीसींची जातनिहाय जनगणना करा,

शेतकऱ्यासाठी एमसपी गॅरंटी कायदा लागू करा खाजगीकरण रद्द करून नोकर भरती सुरु करा, महापुरुषाचा वेळोवेळी अप अपमान करणे थांबवा आदी मागण्याकडे वेधण्यासाठी लक्ष राष्ट्रव्यापी जेलभरो आंदोलन करण्यात येत आहे.

या आंदोलनात गडाचिरोली जिल्ह्यातील जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन बामसेफचे जिल्हाध्यक्ष भोजराज कान्हेकर आरपीआयचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी केले आहे


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2025   

PostImage

समुह निवासी शाळेच्या एका खोलीत ठेवलेल्या साहित्याला कशी लागली आग …


समुह निवासी शाळेच्या एका खोलीत ठेवलेल्या साहित्याला कशी लागली आग ?

 

एटापल्ली : पंचायत समिती एटापल्ली अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या समूह निवासी शाळेच्या एका खोलीला आज दुपारी 11 च्या दरम्यान आग लागली. आगीत जुने साहित्य जळून खाक झाले. उन्हाचा पारा फार भडकलेला नसताना आग कशी काय लागली ? हा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि महत्वाचे म्हणजे त्याच खोलीत आग लागण्याचे कारण अजूनही गुलदस्त्यात आहे.
जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या परिसरात समूह समूह निवासी शाळा चालविण्यात येत होती. गेल्या तीन वर्षापासून तांत्रिक कारणास्तव समूह निवासी शाळा बंद आहे. जिल्हा परिषद कडून चालवण्यात येणारा समूह निवासी शाळेचा उपक्रम बंद असला तरी तीन वर्षापूर्वी निवासी विद्यार्थ्यांसाठी आलेले साहित्य एका जुनाट खोलीमध्ये ठेवण्यात आले आहे. गाद्या, दऱ्या इत्यादी साहित्य या जुन्या खोलीत ठेवण्यात आले होते. सदर साहित्य तीन वर्षांपूर्वी ठेवण्यात आले आहे. या साहित्याची गरज नसल्याने साहित्याची कुणाकडून तपासणी झाली नाही. आज सकाळी 11 च्या दरम्यान साहित्य ठेवण्यात आलेल्या खोलीतून अचानक धूर निघायला लागला. शाळेच्या बाजूलाच पंचायत समिती कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. धूर निघत असल्याचे पंचायत समितीत राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. सदरची सूचना पंचायत समितीला देण्यात आली. पंचायत समितीकडून नगरपंचायत एटापल्लीला कळविण्यात आले. अग्निशामक दलाचे वाहन व कर्मचारी यांनी ही आग आटोक्यात आणली. तोपर्यंत खोलीमध्ये ठेवण्यात आलेले साहित्य जळून खाक झाले होते.
साहित्य जुने असले तरी नेमके किती किमतीचे साहित्य जळून खाक झाले हा तपशील पंचायत समितीकडून अद्याप जाहीर करण्यात आला नाही. खोलीचेही पूर्णपणे नुकसान झाले आहे.
दुपारी अकराच्या दरम्यान लागलेली आग नेमकी कशामुळे लागली हा शोधाचा विषय झालेला आहे. शासकीय पातळीवर लागलेल्या आगीला शॉर्टसर्किटने आग लागली असे नेहमीच सांगण्यात येते. आगीचे नेमके कारण शोधण्याचे आव्हान पंचायत समिती पुढे निर्माण झाले आहे आग कुणी लावली की आपोआप लागली याआगीचा शोध घेण्याची जबाबदारी पंचायत समितीवर आली आहे. 


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2025   

PostImage

महिला प्राचार्य यांना सोशल मिडियाची धमकी देत वाहण चालकाने केला …


महिला प्राचार्य यांना सोशल मिडियाची धमकी देत वाहण चालकाने केला अत्याचार,व लुटले तीन लाख रुपये 

चाळीसगाव : 

फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत प्राचार्य असलेल्या महिलेवर वाहन चालकाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तसेच त्या महिलेकडून ३ लाख ३० हजार रुपये उकळले असून याप्रकरणी मध्यप्रदेशातील राजासिंग अग्निदेवसिंग चव्हाण या इसमाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील एका गावात रहीवास असलेल्या ३५ वर्षीय महिला दुसऱ्या जिल्ह्यातील तालुक्यात प्राचार्य आहे. त्या महिलेचा पती एका गुन्ह्यात कारागृहात असतांना पतीची मध्यप्रदेशातील संशयित राजासिंग अग्निदेवसिंग चव्हाण याच्याशी ओळख झाली. महिलेच्या पतीने चव्हाण यास संपर्कासाठी पत्नीचा मोबाईल नंबर दिला होता. ऑक्टोबर २०२४ मध्ये संशयित राजासिंग चव्हाण हा चाळीसगाव येथे एका पुढाऱ्याच्या ओळखीने चाळीसगाव येथे आला होता. त्यावेळी त्याने त्या महिलेची भेट घेतली होती. त्यानंतर महिलेच्या वाहनाचा चालक म्हणून काम करू लागला. डिसेंबर २०२४ मध्ये संशयित राजासिंग चव्हाण याने महिला महाविद्यालयात गेली असता, तेथे दारूच्या नशेत महिलेशी वाद घालून वाहनात बळजबरीने बसविले. त्यानंतर चाळीसगाव येथील एका लॉजवर नेवून त्याने प्राचार्य महिलेवर अत्याचार केला.

लॉजवरील, व्हिीडीओ, फोटो काढून ब्लॅकमेल करू लागला. हे व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देत महिलेकडून सुमारे ३ लाख ३० हजार रूपये उकळले. याप्रकरणी फसवणुक झालेल्या पीडित महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेऊन घडलेला प्रसंग पोलीसांना सांगितला. पीडित महिलेले दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राजासिंग चव्हाण याचे विरूद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी हे करीत आहेत 


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2025   

PostImage

सराफा व्यापाऱ्याला लावला चोरट्यांनी चूना ! दीड लाखांची केली फसवणूक


सराफा व्यापाऱ्याला लावला चोरट्यांनी चूना ! दीड लाखांची केली फसवणूक

 

 

गडचिरोली,  एकीकडे सोन्याच्या दाराने उच्चांक गाठलेला असताना चक्क 'हॉलमार्क' प्रमाणित बनावट दागिने देत दाम्पत्याने सराफा व्यावसायिकालाच दीड लाख रुपयांनी गंडा घातल्याची घटना गडचिरोली शहरात सोमवारी (दि.7) उघडकीस आली. याबाबत गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय संजय हर्षे यांचे चामोर्शी मार्गावर सराफा दुकान आहे. 4 एप्रिल रोजी दुपारी अक्षय हे घरी गेले होते. दुकानात वडील संजय वामनराव हर्षे होते. यावेळी एक दाम्पत्य दुकानात आले. त्यांनी 24.670 ग्रॅम वजनाची 'हॉलमार्क' प्रमाणित साखळी विक्री कःन 1 काळी पोत, 2 अंगठ्या व 2 जोड कर्णफुले, असे एकूण 1 लाख 45 हजार 590 रुपयांचे दागिने खरेदी केले. साखळीवर हॉलमार्क 916 असे चिन्ह होते. त्यामुळे संजय हर्षे यांना संशय आला नाही. या साखळीचे सोन्याच्या चालू बाजारभावाप्रमाणे 1 लाख 51 हजार 890 रुपये झाले. उर्वरित 6 हजार 300 रुपये हर्षे यांनी संबंधित दाम्पत्यास परत केले. दरम्यान, साखळीची 1 कडी कापून वितळवली असता, ती बनावट निघाली. त्यानंतर अक्षय हर्षे यांनी गडचिरोली ठाण्यात तक्रार केली.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशीः नकली दागिने देऊन फसवणूक करणाऱ्या दाम्पत्याने अयोध्यानगर येथे राहत असल्याचे सांगितले होते. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज व साखळी अक्षय हर्षे यांनी गडचिरोली पोलिसांना दिली आहे. या फुटेजआधारे पोलिसांनी संशयित दाम्पत्याचा शोध घेऊन चौकशी केल्याची माहिती आहे.

सराफा व्यावसायिकाने तक्रार केली आहे. मात्र, त्या • सराफा व्यावसायिकाने तकार केला आहे. मात्र, त्या सुरु आहे. हे दागिने पूर्णतः बनावट आहेत की नाहीत, हे पडताळणीनंतर समोर येईल. त्यानंतरच पुढील कारवाई केली जाईल.

-रेवचंद सिंगनजुडे, पोलीस निरीक्षक, गडचिरोली


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2025   

PostImage

अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, आरोपीच्या आवळल्या मुसक्या


अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण, आरोपीच्या आवळल्या मुसक्या 

 

एटापल्ली : शहरापासून जवळचअसलेल्या एका गावात अल्पवयीन मुलीचे तरुणाने लैंगिक शोषण केले. याबाबत ७ एप्रिल रोजी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. पोलिसांच्या माहितीनुसार, नानेश लुला कुमोटी (२४) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी १४ वर्षांची आहे. नानेश याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले व तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. याबाबत पीडितेच्या घरी माहिती झाली. त्यानंतर पीडित मुलीसह

पीडितेला आरोपीने वारंवार त्रास देण्यास सुरूवात केली. त्यामुळे तिने घरी सांगितले. यानंतर अत्याचाराला वाचा फुटली.

नातेवाइकांनी एटापल्ली ठाणे गाठले. पीडितेच्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४ (२), १७३ (२) अन्वये गुन्हा नोंदविला. यानंतर पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करून आरोपी नानेश कुमोटी याला जेरबंद केले. त्यास मंगळवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे, असे पोनि नीलकंठ कुकडे यांनी सांगितले.


PostImage

Vaingangavarta19

April 8, 2025   

PostImage

आरोपीला पकडण्यात अपयश आल्याने बौद्ध बांधवांचा शांतीच्या मार्गाने आंदोलन


आरोपीला पकडण्यात अपयश आल्याने बौद्ध बांधवांचा शांतीच्या मार्गाने आंदोलन 

आरोपीला अटक केल्याशिवाय गप्प बसणार नाही - समाज बांधवांची आक्रमक भुमिका 

चामोर्शी : तालुक्यातील आंबोली व किष्टापुर येथे अज्ञात समाज कंठक व्यक्तीने आंबोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या सुरक्षा भिंतीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक अश्लिल शब्द व मानवि गुप्तागांचे चित्र काढलेले होते. सदर घटनेबाबत पोलीस स्टेशन आष्टी येथे दिनांक २६/०३/२०२५ रोजी पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन आष्टी यांना तक्रार (फिर्याद) नोंदविण्यात आलेली होती परंतु पोलीस प्रशाषणाला आरोपीला पकडण्यात अजून पर्यंत यश मिळालेले नाही. म्हणून बौध्द अस्मीता रक्षण समिती येनापुर परीसर व समाविष्ठ असलेले समाज मंडळ यांच्या तर्फे दिनांक ०६/०४/२०२५ ला बौध्द बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहुन शांन्ततेने व अहिंसेच्या मार्गाने आंदोलन केले. याअगोदर तालुक्यातील सोमनपल्ली येथील बसथांब्यावर अशाच प्रकारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल अपमानजनक अश्लील शब्दात लिखाण केले होते. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलास अटक केली. परंतु पुन्हा आंबोली, किष्टापूर येथे अज्ञात समाज कंठक व्यक्तीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपमानजनक अश्लील शब्दात लिखाण केले. त्यामुळे बौद्ध अस्मिता रक्षण समिती येनापूर यांच्या वतीने परिसरातील बौद्ध बांधवांनी येनापूर येथील बाजारपेठ बंद करून शांततेच्या मार्गाने आंदोलन केले. यावेळी येनापूर परिसरातील बौद्ध बांधव व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. व पोलीसांचा यावेळी कडेकोट बंदोबस्त होता.


PostImage

Vaingangavarta19

April 7, 2025   

PostImage

जीव गेल्यानंतर अनखोडा - कढोली मार्गावरील नाल्याच्या पुलावरील खड्डा बुजविणार …


 जीव गेल्यानंतर अनखोडा -  कढोली मार्गावरील नाल्याच्या पुलावरील खड्डा  बुजविणार काय ?

बरेच अपघात होऊनही शासनाचे दुर्लक्ष 


आष्टी:-
चामोर्शी तालुक्यातील अनखोडा कढोली- जैरामपुर मार्गावरील नाल्यावर पुलीयाच्या बाजुने 
 2023 मध्धे नाल्याला पुर आल्याने पुलीयाच्या बाजुने खड्डा  पडून  दोन वर्षे झाले बरेचसे दुचाकीस्वार  यांचे रात्रीच्या वेळी अपघात झाले तरीही अधिकारी लक्ष्य देउन काम करीत नाही शासकिय बांधकाम विभाग सुस्त झोपेत असल्याचे दिसून येते आहे 
 सदर पुलीयावरुन  गडचिरोली जिल्यातील आमदार व खासदार 
तथा अधिकारी या  पुलावरुन आजपर्यंत प्रवास केलेला नाही त्यामुळे या बाबींकडे त्यांचे लक्ष नाही  त्या खड्यात रात्रोचे सुमारास बरेच दुचाकीस्वार कोसळले आहेत एखाद्याचा मृत्यू झाल्यानंतर शासनाला जाग येणार आहे काय?  असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे 

या बाबीची त्वरित दखल घेऊन तो जीवघेणा खड्डा बुजवून जनतेला दिलासा द्यावा अशी मागणी परिसरातील जनतेने केली आहे


PostImage

Vaingangavarta19

April 7, 2025   

PostImage

मंत्री महाजनांचे महिला आयएएससोबत संबंध ? खडसेंचा दावा, शाहांकडे आहेत …


मंत्री महाजनांचे महिला आयएएससोबत संबंध ? खडसेंचा दावा, शाहांकडे आहेत कॉल रेकॉर्ड

मुंबई:-

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाजन यांचे एका महिला आयएएस अधिकाऱ्याशी संबंध आहेत, असा दावा खडसे यांनी एका पत्रकाराच्या हवाल्याने केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनाही महाजन यांची सीडी मिळाली आहे ना असे म्हणत खडसेंनी लवकरच शाहांना भेटून याबद्दल प्रश्न विचारेन, असे सांगितले. 'गिरीश महाजनांच्या रंगल्या रात्री अशा' या शीर्षकाचा उल्लेख खडसेंनी केला. त्यांच्या या आरोपानंतर आता राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. दरम्यान, आता खडसेंच्या या आरोपांवर महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खडसेंनी पुरावा द्यावा, मी राजकारण सोडेन, असे आव्हान महाजन यांनी दिले. खडसे पुढे म्हणाले, माझ्या अमित शाहांसोबत बैठका होत असतात. मी त्यांना भेटून यावर चर्चा करेन. जर महाजन यांचे गेल्या दहा वर्षांचे रेकॉर्ड तपासले तर सत्य बाहेर येईल असे मला वाटते.

रात्री 1 वाजता फोन

खडसे म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात बोलावलेल्या बैठकीत अमित शाह यांनी महाजन यांना फोन केला होता आणि महिला आयएएसशी असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दल प्रश्न विचारले होते. त्यानंतर महाजन यांनी आपल्या बचावात म्हटले होते की त्यांना त्यांच्या कामाच्या संदर्भात अनेक अधिकाऱ्यांशी बोलतो. पण शाह यांनी तुमचे कॉल डिटेल्स आमच्याकडे आहेत असे सांगून त्यांना गप्प केले. तुम्हाला रात्री 1 नंतरही फोन आले आहेत. दररोज शेकडो कॉल येत आहेत. सीडी खरे सांगत आहे. तेव्हा शाह यांनी महाजन यांना स्पष्ट शब्दात विचारले होते की. त्या महिलेशी तुमचे काय नाते आहे?

पुरावे द्या, आता राजकारण सोडेन

आरोपांवर उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले, खडसेंनी माझ्‌यावर केलेल्या आरोपांचे पुरावे द्यावेत, असे मी त्यांना आव्हान देतो. त्यांनी एकही पुरावा दिला तर मी सक्रीय राजकारणातून बाहेर पडेल. लोकांनी फालतू बडबड करू नये. कधी म्हणायचे मोबाईल हरवला, कधी म्हणायचे डेटा गायब झाला. खोटे बोलताना लाज वाटत नाही? महाजन पुढे म्हणाले की, मी जर एक गोष्टी सांगितली तर लोक जोड्याने मारतील. माझा अंत बघू नका, मी त्या गोष्टीचा खुलासा केला तर खडसेंना तोंड काळे करुनच बाहेर पडावे लागेल. कुण्यातरी भोंदू पत्रकाराला सांगून विषय उचलायला लावायचा, हे बरे नाही.